पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या ३६ ते ५०

इमेज
🌸 अध्याय पहिला 🌸 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌸 ॥अर्जुनविषादयोग॥ ⛳⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳⛳ 🌼माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भले ॥३६॥ ✏  या (ग्रंथात) मधुरतेलाही गोडी प्राप्त झाली. शोभिवंत वस्तूंना अधिक सुरेखता आली.  योग्य वस्तूंना आलेला रुढपणाचा ही सुंदर प्रत्यय आला. 🌼एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।म्हणऊनि जन्मेजयाचे अवलीळा । दोष हरले ।३७| ✏️येथे कलेला कुशलता, पुण्याला अधिक बळ प्राप्त झाले. म्हणूनच जनमेजयाचे दोष (भारत श्रवणाने ) सहज नाहीसे झाले. 🌼आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥३८॥ ✏ क्षणभर विचार केला असता, असे दिसते की या रंगामध्ये आणखी विविध रंगांचा सहभाग किंवा सद्गुणांना आणखी चांगल्या गुणांची साथ अधिकतेने या ग्रंथात आढळते. 🌼भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।तैसे व्यासमती कळवलें । मिरवे विश्व ॥३९॥ ✏ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले त्रैलोक्य तेजोमय दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापिलेले सगळे विश्व शोभिवंत दिसते. 🌼कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।तैसे भारतीं सुरवाडले । अ...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जूनविषादयोग॥ ओव्या 26 ते 35

इमेज
अध्याय पहिला सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 💡॥अर्जूनविषादयोग॥   🔔ओव्या 26 ते 35🔔 ⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳ 🌸का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥ ✏  जगामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत. त्या सर्वांची तीर्थस्नाने केवळ एकट्या समुद्रस्नानाने घडतात. किंवा फक्त अमृत सेवन केले असता, सर्व रसांची गोडी त्यामध्ये अंतर्भूत असते. 🌸तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥२७॥ ✏ त्याप्रमाणे एकट्या श्रीगुरुंच्या वंदनात सर्वांना वंदन घडते. म्हणून मी सद्गुरुंना वारंवार वंदन करतो. कारण ते मनात आलेले मनोरथ पूर्ण करतात. 🌸आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ।की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥२८॥ ✏ आता ही कथा लक्षपूर्वक ऐका! जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान, किंवा विचाररुपी तरुंचे नवे विशाल अपूर्व उद्यान आहे. 🌸ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥ ✏ म्हणून सर्वसुखाचे आश्रयस्थान आहे. अनेक तत्वार्थांचा मोठा साठा किंवा शृंगारादि नऊ रसांनी तुडुंब भरलेला सागरच ...

ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ¦¦सांख्ययोग¦¦ ओवी २५० ते २५९

इमेज
 ज्ञानेश्वरी अध्याय २ रा 🗡️  ¦¦सांख्ययोग¦¦ 🗡️  ओवी २५०ते२५९ ⛳⛳⛳🔔🏹🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖👇➖➖➖➖ 🔔भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् |व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ||२-४४|| अर्थ 👉 त्या विषय व ऐश्वर्य यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने विवेकबुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषांच्या अंत:करणामधे आत्मतत्वविषयक बुद्धी उद्भवत नाही. ॥२-४४॥ ➖➖➖➖👆➖➖➖➖ 🏹परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।यज्ञपुरुषा चुकती ।भोक्ता जो ॥२५०॥ 🖍️ परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात. 🏹जैसा कर्पुराचा राशि कीजे ।मग अग्नि लाऊनि दीजे ।कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥ 🖍️ ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे. 🏹दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें॥ २५२ ॥ 🖍️ किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवत...

ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्ययोग||

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय २रा 🕉️ ओवी २२६ पासून 🕉️ ||सांख्ययोग|| ⛳⛳⛳🔔🏹🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖👇➖➖➖➖ 🌻सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि॥ ३८ ॥ अर्थ 👉 सुख-सु:ख, लाभ-अलाभ, जय-पराजय ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो. मनाने असे झाले असता तुला पाप लागणार नाही ॥२-३८॥  (सूत्ररूपाने कर्मयोग = २२६-)  ➖➖➖➖👆➖➖➖➖ 🌷सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें ।आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥ ✏ अर्जुना, सुख लाभले तरी आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये. आणि मनात लाभ किंवा हानी धरू नये. 🌷एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल। हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥ ✏ या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा आपला देहच सर्वथैव नाहीसा होईल, या पुढील गोष्टींचे अगोदरच चिंतन करत बसू नये. 🌷आपणयां उचिता।स्वधर्मातेंचि रहाटतां।जे पावें तें निवांता । साहोनि जावें॥२२८॥ ✏ विहित अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्रसंग आपल्याला प्राप्त होतील ते निमूटपणे सहन करत जावे. 🌷ऐसेया मनें होआवें ।तरी दोषु न घडे स्वभावें।म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ||सांख्य योग||

इमेज
ज्ञानेश्वरीअध्याय २ रा 💡 ओवी २१४ पासून ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🌷ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥२१४॥ ✏  असा तुझ्या अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व  कौरव आपल्या जीविताची आशा सोडून प्राणावर उदार झाले आहेत. 🌷जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा।तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥२१५॥ ✏  ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्यावर मदोन्मत्त  हत्तीला ही प्रलयकाळच ओढवला असे वाटते. त्याप्रमाणे  या कौरवांसही तुझा धाकच वाटतो.  🌷जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें।तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा॥ २१६ ॥ ✏ ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला भितात. तसे अर्जुना, हे कौरव सैन्य तुला भिते. 🌷ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल।जरी मागुता निघसील । न झुंजतचि॥२१७॥ ✏ तेव्हा आता जर तू युद्ध न करता मागे फिरशील; तर ही तुझी अपकीर्ती तर होईलच आणि तुझी थोरवी, महतीही नाहीशी होईल मग तुझ्या अंगी हीनत्व प्राप्त  होईल.   🌷आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती।न गणित कुटी बोलती । आइकतां तुज॥ २१८ ✏ बरे ! पळून जाऊ ला...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २०१ ते २१३

इमेज
सार्थ ज्ञानेश्वरी 🌼 अध्याय २ रा   🏹 ओवी २०१ ते२१३  ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖👇➖➖➖ 🌻अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥ ३४॥ अर्थ 👉 सर्व लोक तुझी सर्वकाल अपकीर्ती सांगत राहातील आणि संभावित पुरुषाला तर अपकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे. ॥३४॥ ➖➖➖➖👆➖➖➖ 🌷म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील।आणि अपेश तें न वचेल ।कल्पांतावरी॥ २०१ ॥ ✏ एवढ्याच करीता अर्जुना, पुन्हा ऐक, जर या प्राप्त  प्रसंगी तू आपल्या क्षत्रियधर्माचे पालन केले नाहीस; तर पाप लागेल आणि कल्पांतपर्यंत अपकीर्तीचा डाग नाहीसा होणार नाही.  🌷जाणतेनि तंवचि जियावे ।जंव अपकीर्ति आंगा न पवे।आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां॥ २०२॥ ✏  जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही, तोपर्यंतच व्यवहारी आणि सज्जनांनी जगावे; असे असताना,  मग अपकीर्ती सोबत घेऊन इथूनच (युद्ध  न करता) मागे फिरावे का? 🌷तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता। परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥२०३॥ ✏ आणि जरी तू मत्सररहित दयायुक्त अंतःकरणाने माघारी फिरलास; तरी या सर्वाना ही गोष्ट अथवा...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १९१ ते २००

इमेज
 अध्याय दुसरा 💙  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 💟  ||सांख्य योग|| 💞  ओवी १९१ते२०० ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖👇➖➖➖➖ 🌻यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम्।सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥३२॥ अर्थ 👉 पार्था, अशा प्रकारचे युद्ध म्हणजे सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार प्राप्त झाले आहे. ते भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होते. ➖➖➖➖👆➖➖➖➖ 🌷अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे॥१९१ ॥ ✏ अर्जुना,  हे युद्ध म्हणजे तुम्हा क्षत्रियासाठी तुमचा पूर्वजन्मीचा भाग्योदय झाला असेच समज. अथवा सर्व धर्माचा ठेवा उघड झाला आहे. 🌷हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें।मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥१९२॥ ✏ हा तर तुमच्या मूर्तीमंत प्रतापाने स्वर्गच, युद्ध रूपाने तुमच्यापुढे उभा केला आहे.  🌷ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें।हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥ १९३ ॥ ✏ किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त होवून कीर्तीरूप स्त्रीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न  करण्यास) आली आहे . 🌷क्षत्रिये...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १७६ ते १९०

इमेज
 ज्ञानेश्वरी अध्याय२रा 🕉️  ओवी १७६ते१९० 🕉️  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🕉️  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🌷तैसिया योगीश्वरांचिया मती।मिळणीसवें एकवटती।परी जे विचारूनि पुनरावृत्ति।भजतीचिना॥ १७६॥ ✏याप्रमाणे  या योग्याच्या बुद्धी  ब्रह्मसाक्षात्काराबरोबरच तद्रूप  होतात. मग ते योगी संसाराला किंवा देहादि मायाजालात अडकत नाहीत.  ➖➖➖➖👇➖➖➖➖ 🌸देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥ अर्थ 👉 अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये (असलेला हा आत्मा सर्वकाळ अवध्य आहे. म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस. ॥३०॥ ➖➖➖➖👆➖➖➖➖ 🌷जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक॥ १७७ ॥ ✏ अर्जुना ! जे सर्वत्र, सर्वच  देहात अंतर्यामी रूपाने व्यापले आहे व ज्याचा घात (नाश) ही होत नाही, असे  एक  विश्वव्यापी अधिष्ठान चैतन्यच आहे.  🌷याचेनिचि स्वभावें।हें होत जात आघवें।तरी सांग काय शोचावें।एथ तुवां ॥१७८॥ ✏ या अधिष्ठान चैतन्याच्या आश्रयावरच हे सर्व जग उत्पन्न...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १६४ ते १७५

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय२रा ⚔ ओवी १६४ते१७५ 🗡 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🛎  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 👑अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥२८॥ अर्थ 👉 अर्जुना हे प्राणिमात्र जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात, मग शोक कसला? ॥२-२८॥ ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 🌷जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते।मग पातलीं व्यक्तीतें ।जन्मलेया ॥१६४॥ ✏ (आता दुसर्‍या पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनास समजावतात ते पहा) अर्जुना, उत्पत्तीपूर्वी  हे सर्व प्राणी,  निराकार होते. मग जन्म धारण केल्याने  ते आकाराला प्राप्त झाले. 🌷तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती।देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥ ✏ आता मृत्यू झाल्याने,  ते परत आपल्या मूळ ठिकाणी  जातात आणि ते ही धारण केलेल्या  आकाराने (देहाने) नाही  तर पूर्वीच्या आपल्या  निराकार स्थितीनेच. 🌷येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें।तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं॥१६६॥ ✏  आता मध्यंतरी म्हणजे जन्म आणि म...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १५१ ते १६३

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय२रा 🍒  ओवी१५१ ते१६३ 🌻  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌼  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ (मागील भागावर   एक नजर टाका ) 🌸अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा।मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा॥१५१॥ ✏ अर्जुना, आत्मा हा असा आहे हे तू जाणलेस की मग हा सर्वव्यापी आत्मा दिसला, जाणवला की तुझा हा सर्व शोक नाहीसा होईल.  ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 💜अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं।तथापि त्वं महाबाहो नावं शोचितुमर्हसि ॥२६॥ अर्थ 👉- हे महाबाहो, हा आत्मा नेहेमी जन्म पावतो व नेहेमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील या प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाहीस. ॥२-२६॥ ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 🌸अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी।तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा॥ १५२ ॥ ✏ अर्जुनाला हा आत्मा अविनाशी आहे, हे समजत नसेल तर; हा आत्मा नाशिवंत आहे असे समजून घे .आणि तरीही तुला शोक करण्याचे कारण नाही.  🌸जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु।जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा॥ १५३ ॥ ✏ कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे  अविच्छिन्न आहे, त्याप्रमाणे  उत्पत्ती, स्थिती आणि लय...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा || सांख्य योग|| ओवी १३७ ते १५० पासून

इमेज
 ||ज्ञानेश्वरी सांख्य योग|| 📚  अध्याय २ रा 🔔 ओवी१३७ते १५०पासून  ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🌻 य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्।उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥ अर्थ 👉 हा आत्मा मारणारा आहे, असे जो समजतो, व हा आत्मा मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही ज्ञान नाही. हा आत्मा कोणाला मारीत नाही व कोणाकडून मारला जात नाही. ॥२-१९॥ ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 🌷 तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें।मी मारिता हे मरते । म्हणत आहासी॥ १३७ ॥ ✏ अरे अर्जुना! तू या देहाचा अभिमान धरून या शरीरावरच दृष्टी ठेऊन मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस.  🌷 तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्वता विचारिसी ।तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती॥ १३८ ॥ ✏ तुला यातील तत्वार्थ समजत नाही, याचा विचार  करशील तर लक्षात येईल की, तू मारणारा नाहीस आणि हे ही मरणारे नाहीत.  ➖➖➖➖🌈➖➖➖➖ 🌻 न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः ।अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥ अर्थ 👉 हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा होऊन पुन...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १२६ ते१३६

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय२रा 💜  ओवी १२६ ते१३६ 💛  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 💚  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 👑या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥ ✏ देहादि उपाधिरुप जगामध्ये सर्वव्यापी असे एक गूढ आत्मचैतन्य आहे, त्याचाच तत्वज्ञ म्हणजेच संत सदैव स्वीकार करतात.  👑सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे।परीं निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे॥ १२७ ॥ ✏ जसे पाणी दूधात मिसळून एकरूप झालेले असले तरी राजहंस पक्षी मात्र फक्त दूधच पितो आणि पाणी तसेच वेगळे शिल्लक ठेवतो. 👑कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ।निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥ ✏ अथवा चतुर सोनार जसा डागी सोने अग्नीत घालून त्यातील हिणकस धातू वेगळा काढतो. आणि वाईट सोन्यापासून चांगले सोने बाजूला काढतो. 👑ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें॥ १२९ ॥ ✏ किंवा बुद्धीच्या जोरावर दही घुसळले असता, शेवटी जसे सारभूत लोणी निघालेले दृष्टीस पडते. 👑कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आले॥ १३० ॥ ✏ किंवा एकत्र असलेले कोंडा (धान्याची रास) आणि...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी ११६ ते १२५

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय२रा 🍒  ओवी ११६ ते १२५ 🌻  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌼  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 💙भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख।जें उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥११६॥ 🖍️ पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात. 💙सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु।तोषु देता ॥११७॥ 🖍️ सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.  💙तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥११८॥ 🖍️ त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.  💙देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥ 🖍️ पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो. 💙या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १०३ते ११५

इमेज
 ज्ञानेश्वरी अध्याय२रा 🔔  ओवी १०३ते ११५ 🐚  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 💙  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ ➖➖➖➖💙➖➖➖➖ 🔰न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः।न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥ अर्थ 👉खरोखर मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही. तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. ॥२-१२ ➖➖➖➖💙➖➖➖➖ 🐊अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।आणि हे भूपति अशेख| आदिकरुनी ॥ १०३ ॥ ✏  अर्जुना, आणखी एक सांगतो ऐक, तुम्ही आम्ही  व हे सर्व राजे,  जे ह्या ठिकाणी जमले आहेत.  🐊नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाऊनि ।हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥ ✏ हे सर्व आपण असेच निरंतर राहू किंवा खात्रीने  लयाला जावू, ही भ्रांती सोडून दिली की यापैकी एक  ही खरे नाही, असे कळेल.  🐊हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे।येर्‍हवीं तत्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि॥ १०५ ॥ ✏ कारण आपला सर्वांचा आत्मा एक आहे. तो देहाच्या उपाधीने भिन्न दिसतो. देहाच्या उपाधी संबंधामुळे आत्म्याचे  ठिकाणी भासणारा उत्पत्ती, नाश मायेच्या योगाने...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2रा ||सांख्य योग|| ओवी ९१ ते १०२

इमेज
ज्ञानेश्वरी अध्याय 2रा⛳ 💍  c💍 🍇  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🍊  ||सांख्य योग|| ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🐚श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः॥ ११ ॥ अर्थ👉 भगवान श्रीकृष्ण म्हणाले - शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक करतोस व वर पांडित्याच्या गोष्टी सांगतोस. पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल व न मेलेल्याबद्दल शोक करत नाहीत ➖➖➖➖⛳➖➖➖➖ 🦀मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें ।जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥ ✏ आता देव अर्जुनास आईच्या रागात बोलले की, आम्ही एक हे आश्चर्यच पहात आहोत. कारण युद्ध  समयी तू हे काय भलतेच बोलत आहेस?  🦀तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणीवेतें न संडिसी ।आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति॥ ९२ ॥ ✏ तू स्वतःला तर काय मोठा ज्ञानी म्हणतोस, पण अज्ञान, मूर्खपणा तर काय सोडत नाहीस. तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले तर तूच आम्हास  नीतीच्या, शहाणपणाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. 🦀जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें।तुझे शहाणपण तैसें । दिसतसे॥ ९३ ॥ ✏ जसे एखाद्या जन्मजात आ...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ८१ ते ९०

इमेज
अध्याय दुसरा 🚩  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🔱  ||सांख्य योग|| 🚩  ओवी ८१ ते९० ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🌱संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः।न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ॥९॥ अर्थ 👉  संजय म्हणाला राजा, जितनिद्र असा पार्थ श्रीकृष्णाला असे स्पष्ट सांगून स्तब्ध झाला. ➖➖➖🚩🔱🚩➖➖➖ 🌱ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।पुनरपि शोकाकुलितु । काय बोले॥ ८१ ॥ 🖍️ संजय धृतराष्ट्राला सांगतो, महाराज  पहा तो अर्जुन पुन्हा शोकाकुलित होऊन श्रीकृष्णाशी काय बोलत आहे. 🌱आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥ ८२ ॥ 🖍️ अर्जुन  म्हणतो, देवा आता आपण मला युद्ध  करण्या विषयी कोणत्याही प्रकारे भीड घालण्याच्या भानगडीत पडू नका. आता स्वजनांशी मी निःसंशय  युद्ध करणार नाही  हे पक्के समजा. 🌱ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरोनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते॥८३॥ 🖍️ असे पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीत एकदम बोलून तो स्तब्ध झाला. अशी अर्जुनाची स्थिती  पाहून देवाला मोठे आश्चर्य व...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ६४ते ८०

इमेज
 अध्याय दुसरा 🚩 सार्थ ज्ञानेश्वरी 🔱 ||सांख्य योग|| 🚩 ओवी६४ते ८० ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🔔न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम्।अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥ ८ ॥ अर्थ 👉 भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे अधिपत्यही मिळाले तरीही इंद्रियांचे शोषण करणारा माझा शोक नाहीसा करील असे काही मला दुसरे दिसत नाही. ➖➖➖➖⛳➖➖➖➖ 🏺हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें॥ ६४ ॥ ✏   देवा, हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो मोह,  शोक उत्पन्न झाला आहे तो मात्र आपल्याच उपदेशाशिवाय दूर होणार नाही.  🏺एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल।परि मोह हा न फिटेल । मानसींचा॥ ६५ ॥ ✏ माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे,  तो पृथ्वीचे राज्य मला मिळाले किंवा इंद्रपद देऊ केले तरी हा शोक दूर होणारच नाही.  🏺जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्‍ही पेरिलीं ।तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं॥ ६६ ॥ ✏  जसे पूर्ण भाजलेले बी, चांगल्या सुपीक जमिनीत पेरले आणि त्यास भरपूर पाणी घातले तरी...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ५१ ते ६३

इमेज
अध्याय दुसरा 🚩  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🚩  ||सांख्य योग|| 🔱  ओवी५१ ते ६३ ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🔔हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला।म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना॥ ५१ ॥ ✏ श्री कृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, हे ध्यानात  आल्यावर अर्जुन जरा घाबरला आणि भीतभीत देवाला म्हणाला, देवा आपण का लक्ष देत नाहीत,  ➖➖➖➖🌼➖➖➖➖ ⛳न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः।यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः॥ ६ ॥ अर्थ 👉  या दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे, हे समजत नाही. युद्धामधे आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील? तेही समजत नाही. ज्यांना मारून जगण्याची  आमची इच्छा नाही ते कौरव लढाईकरता समोर उभे राहिले आहेत. ➖➖➖➖🌼➖➖➖➖ 🔔येर्‍हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा॥ ५२ ॥ ✏ देवा असे करू नका, बाकी माझ्या मनात जे होते  ते मी बोललो परंतु यापेक्षा खरे चांगले कोणते ते तुम्हालाच माहीत असेल.  🔔पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्र...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ३९ ते ५०

इमेज
अध्याय दुसरा 🔰  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🏺  ||सांख्य योग|| 🔰  ओवी३९ ते ५० ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🌼गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके।हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥ अर्थ 👉 महान योग्यतेच्या गुरूजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे देखील सेवन करणे श्रेयस्कर आहे. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील पण ते कसे सेवन करावेत ? ॥।२-५॥ ( अर्जुनाचे पुन्हा युद्ध न करण्यावीषयी कारण सांगणे = पुढे चालू)  ➖➖➖➖⛳➖➖➖➖ ☀️देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे।परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये॥ ३९ ॥ ✏ देवा, समुद्र गंभीर आहे असे म्हणतात पण तो ही प्रक्षुब्ध झालेला दिसतो. परंतु द्रोणाचार्य प्रक्षुब्ध  झालेले कधी दिसले नाहीत.  ☀️हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।परि अगाध भलें गहन । हृदय यांचे॥ ४० ॥ ✏ अहो, आकाशाचा अंत नसला तरीही त्याचे मोजमाप  करता येईल. परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण  इतके विचारपूर्ण आणि सखोल आहे की त्याचे प्रमाण  कोणालाही कळत नाही.  ☀️वरी अमृतही विटे ...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी २१ ते ३८

इमेज
अध्याय दुसरा 🌼  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌸  ||सांख्य योग|| 🌼  ओवी२१ ते ३८ ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🔔क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते ।क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥३॥ अर्थ 👉  हे पार्था, दुबळेपणाचा त्याग कर. हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना, युद्धाला उठ.॥२-३॥  ➖➖➖➖⛳➖➖➖➖ 🌹म्हणोनि शोक न करीं।तूं पुरता धीरु धरीं।हे शोच्यता अव्हेरीं। पंडुकुमरा ॥२१॥ ✏  म्हणून अर्जुना! तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर आणि आप्तपरिवाराबद्दलचा हा विषाद सोडून दे. 🌹तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत ।तूं अझुनिवरी हित । विचारी पां॥२२॥ ✏ तुला असा खेद करणे शोभा देत नाही. आजपर्यंत  जे यश कीर्ती तू संपादित केलीस, या योगाने तिचा नाश होईल. म्हणून अजून तरी आपले हित कशात  आहे याचाच विचार कर. 🌹येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥२३॥ ✏ अर्जूना अरे, क्षत्रियाला ऐन युद्धप्रसंगी असा  कृपाळूपणा उपयोगी नाहीच. आणि हे कौरव आणि सर्व योद्धे काय आजच तुझे नातलग झाले आहेत काय? सांग...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १ ते २०

इमेज
अध्याय दुसरा 🌼  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌸  ||सांख्य योग|| 🌼  ओवी १ ते २० ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 🔔संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्। विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥ अर्थ 👉  संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले. ॥२-१॥ ➖➖➖➖⛳➖➖➖➖ 🐚मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें। शोकाकुल रुदनातें । करितुसे॥ १॥ ✏ मग संजय धृतराष्ट्र रायास म्हणतो, महाराज  अर्जुन त्याठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला.  🐚तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।तेणें द्रवले असे चित्त ।कवणेपरी ॥ २ ॥ ✏ आपले सर्व कूळ पाहून; त्याच्या मनात  विलक्षण  मोह उत्पन्न झाला. आणि त्यायोगे त्याचे चित्त द्रवले. 🐚जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें॥ ३॥ ✏ जसे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्‍याने ढग नाहीसे होतात  त्याप्रमाणे  अर्जुन धैर्यशील असूनही  त्याचे ह्रदय द्रवीभूत झाले.  🐚म्हणोनि कृपा आकळ...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुनविषादयोग ओवी २६१ ते २७५

इमेज
 अध्याय पहिला 💛  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 💜 ||अर्जुनविषादयोग  💛  ओवी २६१ ते २७५ ⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳ 💛पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही। येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥ ✏ अर्जुन म्हणतो, त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून सुटका होत नाही. इतका या कुलक्षयाने अःधपात होतो. 💛देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे ।हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां॥ २६२ ॥ ✏ देवा, हे सर्व आपल्या शास्त्रातील वचने ऐकून  आपण त्याचा विचारही करू नये का? की तरीही आपण ह्रदय वज्राचे बनवून कुलक्षयास तयार व्हावे काय? याचा जरा विचार करावा.  💛अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।ऐसे जाणतांही दोष । अव्हेरू ना॥ २६३ ॥ ✏ शिवाय हा कुलक्षय करून जे राज्य सुख या शरीराला मिळेल ते हे शरीरही क्षणिक आहे (शरीर  मरणारेच आहे) हे जाणूनही मग या कुलक्षयाचा विचार सोडून देऊ नये का? 💛हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा॥ २६४ ॥ ✏ आमचे हे सर्व वडील, आप्तेष्ट, नातेवाईक  यांच्याकडे, त्यांचा वध करण्याच्या हेतूने मी ...