सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी१४९ ते१६३
अध्याय पहिला
🙏 सार्थ ज्ञानेश्वरीओव्या
👉 ॥अर्जुनविषादयोग॥
🔰 ओवी१४९ ते१६३
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🍏अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः| नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ॥ १६॥
अर्थ 👉 कुंतुपुत्र राजा युधिष्ठाराने अनंतविजय, नकुलाने सुघोष, आणि सहदेवाने मणिपुष्पक -
➖➖➖➖➖➖➖➖
🌸तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे॥१४९॥
✏ त्या शंखाचा अतीगंभीर ध्वनी महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. त्यातच धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजविला.
🌸नकुळें सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु।जेणें नादें अतंकु । गजबजला असे॥ १५०॥
✏ नकुलाने सुघोष तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले, त्या आवाजाने प्रत्यक्ष यमाचेही धाबे दणाणून गेले.
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
💚काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः|दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥
अर्थ 👉 महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टधुम्न, विराट, शत्रुकडून कधीही पराजय न पावलेला सात्यकी, ➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
🍏द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते | सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक्॥१८॥
अर्थ 👉 द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु अभिमन्यु इत्यादिकांनी, हे पृथ्वीपते, धृतराष्ट्रा, चोहोकडून सर्वांनी आपापले शंख वाजवले.
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
🌼तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक।हा काशीपती देख । महाबाहु ॥१५१॥
✏ या युद्धभूमीवर दृपद राजा द्रौपदीचे पुत्र, आणि काशीराजा हे योद्धे जमले होते.
🌼तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।दृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन॥१५२॥
✏ अर्जुनाचा पूत्र अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकि नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी जमले होते.
🌼विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले॥१५३॥
✏ त्याचप्रमाणे विराट राजा आणि इतर मुख्य वीर सैनिक यांनीही आपापले शंख वाजविले.
🌼तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचिते।गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती॥१५४॥
✏ त्या शंखांच्या आवाजाने शेष कूर्म हे दचकले आणि पृथ्वीचा भार सोडून देतात की काय असे झाले.
🌼तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित ।समुद्रजळ उसळत ।कैलासवेरी॥१५५॥
✏ तसेच तीनही लोक ( स्वर्ग, मृत्यू, पाताळ ) आणि मेरू व मांदार हे पर्वत डळमळू लागले. समुद्रजळ कैलासापर्यंत उसळले.
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
🍏स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन्॥१९॥
अर्थ 👉 पृथ्वी व आकाश ही दणाणून सोडणार्या त्या शंखाच्य़ा) तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली.
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
🌸पृथ्वीतळ उलथों पाहत । आकाश असे आसुडत। तेथ सडा होत । नक्षत्रांचा।।१५६॥
✏ पृथ्वी पालथी होते की काय, आकाश कोसळून पडते की काय किंवा नक्षत्रांचा पाऊस पडतो की काय असे वाटले.
🌸सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं।१५७ ॥
✏ सत्य लोकी तर सृष्टी बुडाली आहे असे आणि देव निराधार झाले अशी हाकाटी झाली.
🌸दिहाचि दिन थोकला ।जैसा प्रलयकाळ मांडला।तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं॥१५८॥
✏ सूर्य दिवसाच थांबले आणि प्रलय झाला. तिन्ही लोकी हाहाकार उठला .
🌸तंव आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु।मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो॥१५९॥
✏ ते पाहून भगवान श्रीकृष्णही विस्मित झाले आणि कदाचित पृथ्वीचा अंत होईल असे जाणून त्यांनी सर्व गोंधळ बंद केला.
🌸म्हणोनि विश्व सांवरले । एर्हवीं युगांत होतें वोडवले।जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं॥१६०॥
✏ म्हणून हे जग वाचले नाहीतर त्या आवाजानेच या जगाचा अंत झाला असता.
🌸तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला॥ तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥१६१॥
✏ पांडवसैन्यातील शंख तर बंद झाले पण त्याच्या प्रतिध्वनीच्या आवाजानेच कौरवसैन्याची दाणादाण झाली.
🌸तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु।तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया॥१६२॥
✏ ज्याप्रमाणे सिंहाच्या आवाजाने हत्तींच्या कळपाची पांगापांग होते तसे कौरवसैन्याची दाणादाण झाली.
🌸तो गाजत जंव आइकती ।तंव उभेचि हिये घालिती।एकमेकांते म्हणती । सावध रे सावध॥१६३॥
✏ जेव्हा गाजत असलेला तो प्रतिध्वनी ऐकला तेव्हा सर्वांनी धैर्य सोडले. आणि एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा