सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १६४ ते १७४
अध्याय पहिला
🏏 सार्थ ज्ञानेश्वरीओव्या
💈 ॥अर्जुनविषादयोग॥
🎖️ ओवी१६४ ते१७४
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
💙अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः ।प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः॥ २०॥
अर्थ 👉 कौरवपक्षीय सैनिक (पुन्हा) व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्यावेळी आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन -
➖➖➖👁️🌸👁️➖➖➖
💚तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते।तिहीं पुनरपि दळातें । आवडलें ॥१६४॥
✏ कौरव सैन्यातील भीतीयुक्त वातावरण घालवण्यासाठी त्या सैन्यातील शूर वीरांनी त्यांना शांत केले.
💚मग सरिसपणें उठावले । दुणावटोनि उचलले ।तया दंडी क्षोभलें ।लोकत्रय॥१६५॥
✏ मग ते मोठ्या तयारीने सरसावले. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन त्रस्त होऊन गेले.
💚तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।जैसे प्रलयांत जलधर । अनिवार का॥१६६॥
✏ ज्याप्रकारे प्रलयंकारी मेघ एकसारखी वृष्टी करतात, तसेच तेथे धनुर्धर वीरांनी तीक्ष्ण बाणांची वृष्टी केली.
💚तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मने। मग संभ्रमे दिठी सेने । घालितसे॥१६७॥
✏ ते पाहून अर्जुनाला फार आनंद झाला. त्याने आवेशयुक्त नजर आपल्या सैन्यावर टाकली.
💚तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले।मग लीला धनुष्य उचलिले । पंडुकुमरें॥१६८॥
✏ तेव्हा सर्व कौरव सैन्य युद्धास सज्ज झालेले पाहून अर्जुनानेही आपले धनुष्य सहज उचलले.
➖➖➖👁️👇👁️➖➖➖
💙हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।अर्जुन उवाच|सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत॥ २१।
अर्थ 👉 हे धृतराष्ट्रा, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना पुढील वाक्य बोलला, “हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर.
➖➖➖👁️👆👁️➖➖➖
💚ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा ।आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां॥ १६९॥
✏ तेव्हा अर्जुन श्रीकृष्णास म्हणाले, "देवा, आपला रथ दोन्हीही सैन्याच्या मध्ये नेउन उभा करा.
➖➖➖👁️👇👁️➖➖➖
💙यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्।कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे॥ २२॥
अर्थ 👉 म्हणजे युद्धाची इच्छा करून त्यासाठी तयार असलेले हे सर्व योद्धे मी अवलोकन करीन व या रणसंग्रामामधे मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे ते मी पाहून घेईन.
💙योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः ।धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः॥ २३॥
अर्थ 👉 दुर्बुद्धि धृतराष्ट्रापुत्राचे (दुर्योधनाचे) युद्धामधे प्रिय करण्याची इच्छा असलेले जे हे योद्धे येथे गोळा झालेले आहेत त्यांना मी अवलोकन करीन. ॥१-२३॥
➖➖➖👁️👆👁️➖➖➖
💚जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।न्याहळीन अशेख । झुंजते जे॥ १७०॥
✏ म्हणजे येथे युद्ध करण्यासाठी आलेल्या सर्व वीरांना मी क्षणभर न्याहाळून पाहीन.
💚एथ आले असती आघवे । परी कवणेंसी म्यां झुंजावे।हे रणीं लागे पहावें । म्हणऊनियां॥ १७१॥
✏ येथे सर्वच युद्धासाठी आलेले असले तरी मला कोणाशी लढावे लागणार हे पहावे लागेल.
💚बहुतकरुनि कौरव ।हे आतुर दुःस्वभाव | वाटिवांवीण हांव । बांधिती झुंजीं॥१७२
✏ हे बहुतेक उतावीळ व दुष्टबुद्धी कौरव अंगात पराक्रम नसताना युद्धाची हाव धरतात.
💚झुंजाची आवडी धरती ।परी संग्रामी वीर नव्हती।हे सांगेन रायाप्रती । काय संजयो म्हणे।१७३॥
✏ यांना युद्धाची हौस आहे खरी पण यांच्याने रणभूमीवर धीर धरवत नाही.
➖➖➖👁️👇👁️➖➖➖
💙संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्॥२४॥
अर्थ 👉 संजय म्हणाला, “हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी (तो) श्रेष्ठ रथ थांबवून१-२४॥
➖➖➖👁️👆👁️➖➖➖
💚आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला।दोहीं सैन्यामाजि केला।उभा तेणें॥१७४॥
✏ संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की, अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाने रथ पुढे घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा