पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किडनी - रचना, कार्य आणि आजार

इमेज
   मानवी शरीर त्याची रचना, कार्य हे सर्व म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. मनुष्य त्याची नक्कल करून एकेक यंत्र बनू पाहत आहे. काही अंशी या प्रयत्नांना यशही आले आहे. उदा.- मेंदूची नक्कल करून संगणक तयार करणे. तरीपण या यंत्रापेक्षा मानवी शरीर आणि त्यातील अवयव यांना पर्यायच नाही. आपल्या शरीरात अद्भुत पणे काम करणाऱ्या अवयवांपैकी किडनीची रचना, कोणत्या परिस्थितीत किडनी कसे काय काम करते आणि किडनीला जर व्यवस्थितपणे योग्य प्रमाणात काम करता आले नाही तर आजार कसे काय निर्माण होतात याविषयी माहिती घेऊयात.  रस्त्याने एखाद्या सार्वजनिक शौचालया समोरून जर आपण गेलो तर त्या उग्र वासामुळे नाकास झिणझिण्या येतात. डोळ्यास देखील त्या वासामुळे चुरचुरते आणि पाणी येते. काहीजणांना त्या वासामुळे ठसका लागतो. तर काही जणांना उसासे येऊन उलटी देखील होते. मनाला त्या वासाची घृणा म्हणजे तिटकारा येतो. म्हणजे एकाच वेळी आपल्या ज्ञानेंद्रिये, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि मनावर याचा परिणाम होतो. बाहेर हवेच्या संपर्कात असलेल्या, उघड्यावर पडलेल्या लघवीच्या वासामुळे आपल्यावर एवढा परिणाम होतो तर मग आपल्या शरीरात रक्तातील टाक...

समतोल आहार | षड् रसात्मक आहार

इमेज
  आपण सर्वजण अर्थाजन करतो ते मुख्यतः पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी. त्यामुळे फक्त डॉक्टरांचा नव्हे तर सगळ्यांचा सल्ला - दररोज समतोल आहार घ्यावा. आयुर्वेदाने समतोल आहार म्हणून षड् रसात्मक आहाराचा विचार मांडला आहे. षड् रसात्मक आहार म्हणजे सहा रसयुक्त आहार. रस म्हणजे चव किंवा टेस्ट.  जीभेला ज्याचे ज्ञान होते ती चव किंवा रस. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, आणि तुरट अशा सहा वेगवेगळ्या चव आहेत. या प्रत्येक चवीचा किंवा रसाचा उपयोग काय? शरीरावर आणि मनावर त्या-त्या चवीचा कोणता परिणाम होतो? त्या चवीचा पदार्थ खाल्लाच नाही तर किंवा अति प्रमाणात खाल्ला तर कोणते दुष्परिणाम होतील, याची सविस्तर माहिती घेऊयात.  १) मधुर रस/ गोड चव :--->  अगदी तान्हुल्या बाळास आपण फक्त गोडसर चवीचे पदार्थ देतो. उदा. दूध+साखर.  गोड चवीचे पदार्थ आपणास जन्मापासून मानवतात. त्यामुळे अगदी नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत आणि दुबळ्या, अशक्त, आजारी लोकांपासून ते निरोगी, सशक्त माणसांपर्यंत सगळ्यांनाच गोड चवीचे पदार्थ उपयोगी असतात. आपले पंचज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे,जीभ, त्वचा आणि ज्ञानेंद्रिये व ...

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

इमेज
  देवाने सर्व प्राणीमात्रांना ज्ञानेंद्रिये दिले आहेत. या ज्ञानेंद्रियांपैकी काही प्राण्यांमध्ये नाकाने वास घेण्याची क्षमता सर्वात उत्तम असते. तर काही प्राण्यांमध्ये कानाने ऐकण्याची क्षमता सर्वात उत्तम असते. आज आपण ज्ञानेंद्रियांपैकी कानाची ऐकण्याची क्षमता का कमी होते याची माहिती घेणार आहोत. डोळ्याने दिसण्याचे थोडे जरी कमी झाले तरी पेशंटच्या लगेच लक्षात येते. पण कानाने ऐकण्याची क्षमता थोड्या प्रमाणात कमी झाली असेल तर ते पेशंटच्या लक्षात देखील येत नाही. बहिरेपणा कधी क्रमशः येतो तर कधी अचानक येतो, कधी मानसिक असतो तर कधी कानाच्या रचनेत किंवा कार्यात बिघाड झाल्याने येतो. बहिरेपणा काही पेशंटमध्ये जन्मत:च असतो तर काही पेशंटमध्ये जन्मानंतर आलेला असतो किंवा म्हातारपणामुळे / उतार वयामुळे आलेला असतो. कानामध्ये मळ, फंगल इन्फेक्शन, गाठ असेल तर ऐकू कमी येते किंवा ऐकू येत नाही, कानात एखादी वस्तू (दगड, बिया, किडे) अडकल्यास किंवा कानाची पोकळी बारीक झाल्यास ध्वनीलहरींच्या वहनात अडथळा आल्याने ऐकू कमी येते. कानाच्या आत तीन छोटी-छोटी हाडे आहेत त्यांच्यात किंवा कानाच्या पडद्यात जर जन्मतः दोष असला किंवा...